असाच एकदा चिमुकल्यांचा भातुकलीचा थाट बघितला अन् बरच काही आठवल
थाट भातुकलीचा !!
कल्लोळ वेल्हाळ मदमस्त गोपाळ
गलका बालकांचा हा घाट काल्याचा
हरि एक आहे मुरारी भातुकलीचा दाणा अमृतापरी
का उरी बाळगावे तत्वज्ञान
जणू कोरडेच पाषाण
बोबडे बोल नसे का पुरे ते आयुष्यास
आणला चिव चिव करूनी दाणा
पाणी, काडीक, अग्नी आणि संसार सारा
चिंची खाली मंडप मांडला, भात आता रांधून झाला
कस जमले चिमुकल्या डोळ्याना, इवल्या इवल्या हाताना
पंगत उठली गंमत संपली, सारी पाखर उडून गेली
एक सुंदर स्वप्न गबाडल
मन मात्र अजूनही स्मरत ते चींचेच गाण
विहीरीखालच्या आंब्याच्या आंबट कैर्या,सूर पारंब्या
तळ्यातल्या त्या मासोळी उड्या, उन्हाकाठी सतत उंडरण
आणि बरच काही सांगायाच राहून गेलेले
निपचीत अस मनाच्या काठी पहुडलेल...
-धनंजय :-)